नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

आयसीआयसीआय लोम्बार्डकडून रस्ते सुरक्षेप्रती वचनबद्धता पुन्हा अधोरेखित

सुरक्षितरित्या वाहन चालवण्याच्या पद्धतींबद्दल जागरूकतेसाठी नागपूरमध्ये राइड टू सेफ्टी रॅलीचे आयोजन करण्यात आले मुलांना, पालकांना वाहतूक पोलिसांना १,००० हेल्मेटचे वाटप करण्यात आले २०१५ पासून १० लाखांपेक्षा अधिक भारतीयांशी थेट संवाद साधत आहे आतापर्यंत भारतात 6 लाख हेल्मेट वितरित करण्यात आले आहे आणि हा कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे आयसीसी आय लोंबार्ड कंपनीने सांगितले याप्रसंगी डिसिपी वाहतूक रश्मिता राव यांनी हेल्मेट चे महत्व विषद केले नागपूर महापौर नीता ठाकरे यांनी असे रस्ते वाहतूक व सुरक्षा संबंधित कार्यक्रम व जागरूकता होणे काळाची गरज आहे आणि आभार मानले रेल्वे मेन्स स्कूल चे अध्यक्ष विजय ठाकरे याचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे याचा सत्कार करण्यात आला व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला

नागपूर: आयसीआयसीआय लोम्बार्ड ने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात नागपूर येथे राईड टू सेफ्टी रॅलीचे आयोजन केले होते. नागपूर शहराच्या सन्माननीय महापौर नीता राजेंद्र ठाकरे पोलीस उपायुक्त (वाहतूक) रश्मिता राव यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा उपायांबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. शालेय विद्यार्थी पालकांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. हेल्मेट वापरण्यासह रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. या उपक्रमांतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्डने संरक्षणात्मक साधनांचे महत्त्व सुरक्षित प्रवासाच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल एक हजार हेल्मेटचे वाटप केले. आयसीआयसीआय लोम्बार्ड रस्ते सुरक्षेसाठी कटिबद्ध असून जनजागृती, प्रतिबंध पुनर्वसन अशा सर्वच स्तरांवर कार्य करते. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत वर्तणूक बदल घडवून आणण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केलेले आहे. यासाठी खास थेट संपर्क कार्यक्रमांचेसुध्दा आयोजन केले जाते, सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटसारख्या संरक्षणात्मक साधनांचे वाटप करून त्यांचे महत्वसुध्दा मनावर ठसविले जाते.
अधिक धोका असलेल्या भागात अपघाती मृत्यू रोखण्यासाठी ही कंपनी ट्रॅफिक पोलिसांच्या सहकार्याने एकत्रित काम करते. तसेच, नोएडा पाटणा येथील पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून अपघातग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे कामही करते. सप्टेंबर २०१५ मध्ये हा सामाजिक उपक्रम सुरू झाल्यापासून, कंपनीने जीवन सुरक्षित बनविणाऱ्या रस्ते सुरक्षा नियमांबद्दल जागरूकता निर्माण केली आहे. वाहन विम्याची गरज व महत्त्व अधिकाधिक व्यक्तींना विषद करत १० लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. गत काही वर्षांत, आयसीआयसीआय लोम्बार्डने भारतात सहा लाखांहून अधिक हेल्मेट्सचे वाटप केले आहे. रस्ते सुरक्षा मोहिमेचा व्यापक दृष्टिकोन मांडताना आयसीआयसीआय लोम्बार्डच्या मार्केटिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स सीएसआर प्रमुख श्रीमती शीना कपूर म्हणाल्या, आयसीआयसीआय लोम्बार्डसाठी रस्ते सुरक्षा हा केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, तो विमा व्यवसायाचा मुख्य उद्देशाचा एक अविभाज्य भाग आहे. खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून तिचे रूपांतर लोकांच्या रोजच्या जबाबदार वर्तनात झाले पाहिजे. राईड टू सेफ्टी या मोहिमेद्वारे कंपनी पालक मुलांशी संवाद साधणे, हेल्मेट वाटप यासारख्या उपक्रमांतून रस्त्यावर उत्तरदायित्वाची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रयत्न केवळ जनजागृतीपुरते मर्यादित नसून त्यात सुरक्षित वाहन चालवण्याच्या पद्धतींसाठी पाठपुरावा करणे, अपघातप्रवण ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी अभियांत्रिकी उपाययोजना सुचविणे अपघातग्रस्तांसाठी पुनर्वसन सहाय्य यांचाही समावेश आहे. प्रतिबंधात्मक उपायांद्वारे रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करणे भारतीय रस्त्यांवर कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवून आणणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.